पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) येत्या काळात विविध आव्हानांचा सामना करून देशाला कृषी उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यात आपले शेतकरी आणि कृषी वैज्ञानिक यशस्वी होतील असा विश्वास केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल व्यक्त केला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुण्यातील कृषी औद्योगिक संशोधन संस्था अर्थात अटारीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण तोमर यांच्या हस्ते दुरुस्त पद्धतीने झालं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी कृषी संशोधन परिषदेचे अतिरिक्त महासंचालक वेद प्रकाश सहल आटांचे संचालक डॉक्टर लाखन सिंह यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या पुढील काळात देशभरातील कृषी विज्ञान केंद्राच्या 25% क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचे प्रयोग करणे बंधनकारक करण्यात आल्याचं कैलास चौधरी यांनी यावेळी सांगितलं कोल्हापूरच्या कणेरी मठाचे कर सिद्धेश्वर स्वामी यांनी यावेळी दुरस्त पद्धतीनं मार्गदर्शन केलं आगामी काळात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीवर भर दिला जाणार असून त्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका फार महत्त्वपूर्ण राहणार असल्याचं केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी काल पुण्यात बोलताना सांगितलं नैसर्गिक शेती आणि तृणधान्य या विषयावरील कार्यशाळेचा उद्घाटन चौधरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी औद्योगिक संशोधन संस्थेने हे कार्यशाळा आयोजित केली होती परिषदेचे अतिरिक्त महासंचालक डॉ. बीपी शहा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या विषयावरील पुस्तकांचे प्रकाशानेही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.
