पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) शाश्वत आणि स्वच्छ शहर या तत्त्वांना अनुसरून पर्यावरण पूरक विकास करण्याच्या दृष्टीने राज्याची वाटचाल असेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे ते काल दाओस इथं बदलत्या पर्यावरणाचा विकासावर परिणाम आणि पर्यावरण पूरक विकास या विषयावरील चर्चेत बोलत होते कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पवन आणि सौर ऊर्जेला प्रोत्साहन वनाच्छादन वाढवणे घनकचरा व्यवस्थापन आणि शाळांमध्ये हवामान शिक्षण यावर राज्य सरकारचा भर आहे शाश्वत विकास हवा असेल तर सार्वजनिक खाजगी भागीदारी गरजेची आहे आणि महाराष्ट्र त्यात अग्रेसर आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं भारताचा जीवी समूहाचा अध्यक्ष पद ही महाराष्ट्रासाठी हवामान बदलाचा सामना करण्या संदर्भात पथदर्शी आराखडा तयार करण्याची संधी आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आतापर्यंत राज्यातल्या सुमारे 88 हजार 420 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत त्यातील 42 हजार 520 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली त्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रावर उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचा सिद्ध झाला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले जागतिक आर्थिक मंचांना आयोजित केलेल्या या परिषदेतील महाराष्ट्राच्या जालनाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली या दालनाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीचा दर्शन घडवला जाणारा सण महत्त्वाच्या उद्योगांसोबत सामंजस्य करारही केले जाणार आहेत
