पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची चाहूल लागल्याने स्थानिक पातळीवर आपापले हातखंडे वापरण्यात राजकीय पुढारी व्यस्त दिसत आहेत यात कोणाची कसी गोची करायची याचे डावपेच आखले जात आहेत. हवेलीतील विशेषतः पूर्व हवेलीतील बड्या गावाची आपल्यावर मेहेर नजर रहावी यासाठी छोट्या गावांचा बळी देऊन कोंडीत टाकण्याचे काम होत आहे.
वाघोली, फुरसुंगी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक यासारख्या गावाचे महानगरपालिकेत विलिनीकरण झाल्यानंतर केवळ लोणी काळभोर व उरुळी कांचन ही दोनच मोठ्या लोकसंख्येची गावे शिल्लक राहिली त्यामुळेच छोट्या लोकसंख्येच्या गावच्या जिल्हापरिषदेत प्रतिनिधित्व मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या परंतु नव्या प्रभाग रचनेत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती यांना यात कसा फायदा होईल अशीच रचना तयार करण्यात आली त्यामुळेच ही दोन्ह गावे वेगवेगळी असली तरीही भौगोलिक दृष्टीने एकच असल्याने दोन जिल्हा परिषद गट आपल्याच ताब्यात ठेवणार हे चित्र दिसून येत आहे
पूर्व हवेलीतील थेऊर, कोलवडी, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा, नायगाव, पेठ या गावांना या प्रभाग रचनेत आपला वेगळा जिल्हा परिषद गट मिळेल अशी आशा होती परंतु तसे झाले नाही त्यामुळे या गावातील स्थानिक नेत्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.या नाराजीमधून भविष्यात नेमकी काय गणित उभी राहू शकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे कारण या अगोदर अनेक धक्कादायक निकाल याच भागात लागल्याचे आपण पाहिले आहे.
