पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) अतीराग किती नुकसान दायक ठरू शकतो याची आपल्या बरोबर समाजाला सुद्धा किंमत चुकवावी लागते याचा प्रत्यय साताऱ्यातील या घटनेने समोर आली आहे. पती पत्नीच्या भांडणात पतीने लावलेल्या आगीत शेजाऱ्यांची दहा  घरे जळून खाक झाली यात जवळपास५०,लेखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालूक्यातील माजगाव येथील या घटनेत पतींनं स्वतःच्याच घराला आग लावली यात शेजारी असणाऱ्या तब्बल दहा घराना देखील आगची झळ बसल्याने ही घरे आगीच्या भक्षस्थानी आली असून यात लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे यात संबधित पतीला पोलिसांनी अटक केली आहे
किरकोळ कारणांवरुन पत्नीशी भांडण झाल्याने राग सहन न झाल्याने पतीने स्वतःचे घर पेटवून दिले त्याच्या या कृत्यामुळे त्यांच्या शेजारी राहणाऱ्याना यांची चांगलीच किंमत मोजावी लागली यात तब्बला दहा घरांना आग लागली यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून घरांचे मोठे नुकसान झाले आहे
पाटण तालूक्यातील माजगाव येथे राहणारे संजय पाटील आणि पत्नी  याच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झाली याचा राग सहन न झाल्याने संजय पाटील याने आपले घर पेटवून दिल्यामुळे घरात असलेल्या सिलेंडरने पेट घेऊन त्याचा स्फोट झाला आगीने रौद्र रुप धारण केले या आगची तीव्रता इतकी होती की शेजारच्या घरानी देखील पेट घेतला यात दहा घरे आगीमुळे जळून खाक झाली यात लाखो रुपयाचे नुकसान झाले असून या घटनेमुळे राग आणि भीक माग या म्हणीचा प्रत्यय आला पती संजय पाटील याला मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *