लोणी-काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन)
नको पांडूरंगा मला सोन्या – चांदीचे दान रे..
फक्त भिजव पांडूरंगा हे तहानलेले रान रे..
कमरेवरचा हात सोडुन आभाळाला लाव तू
ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तु ..
मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान,
दर वर्षी भरभरून पिकु दे
माझ्या शेतक-यांचे रान रे
        अशी आर्त विनवणी विश्वाच्या नायकास अर्थात पंढरीच्या पांडुरंगास करत पंढरीच्या वाटेने निघालेला वैष्णवाचा मेळा केवळ विठ्ठलाचा नामघोष करत पुण्यनगरीचा दोन दिवसाचा पाहुणचार घेऊन पुणे सोलापूर महामार्गाने निघाला.संपुर्ण राज्यात मोसमी पाऊस दाखल होऊनही तो सक्रिय होत नसल्याने दुष्काळाचे सावट निर्माण होत आहे. अनेक भागात पाऊस झालेला नसल्याने फक्त आपल्या लाडक्या विठूरायावर भरवसा ठेवून नामघोष करत भक्तीसोहळा निघाला.तो लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात सायंकाळी सात वाजता मुक्कामी पोहोचला.यावेळी लोणी काळभोर ग्रामस्थांनी या सोहळ्याचे भव्य स्वागत केले.जागोजागी रांगोळ्याच्या व फुलांच्या पायघड्या घालून फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत झाले. परंतु आज अचानक पावसाने हजेरी लावली जोरदार पाऊस पडला अचानक आलेल्या पावसाने सर्वांची पळापळ झाली.
        गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता.वारकरी संप्रदायात आषाढी वारीचे अनन्यसाधारण महत्त्व असते त्यामुळेच यावर्षी या सोहळ्यात नेहमीपेक्षा मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यात सहभागी झाल्याचे दिसून आले वारकर्यांमध्ये प्रचंड उत्साह ओसंडून वाहत होता.विठ्ठलाच्या भेटीची आस मनी धरुन पंढरीच्या दिशेने हा भक्तीसागर पुढे पुढे निघाला आहे.तसेच कोरोना सारख्या महामारीतून या विश्वाची सुटका करण्याची विनवणी आपल्या लाडक्या विठूरायाला साकडे घालत आहेत.
        पुण्यनगरीचे दोन दिवसाचा पाहुणचार घेऊन आज शुक्रवारी जगतगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. ग्रामीण भागातील पहील्या मुक्कामासाठी लोणी काळभोर कडे प्रस्थान केले. हडपसर येथे दुपारची विश्रांती घेतल्यानंतर दिंड्या पुढे मार्गस्थ झाल्या.
      कवडीपाट येथे जिल्हा परिषद तसेच हवेली पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के व पदाधिकारी यांनी पालखीचे स्वागत केले.
         पुण्यातील दोन दिवसांच्या विश्रांतीमुळे वारकरी झपझप पावले टाकत होती.सावळ्या विठुरायच्या भेठीसाठी आतुर झालेले वारकरी,हरिनामाच्या जप करत मार्गस्थ झाली. पालखीसोहळ्यांने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश केला.त्यावेळी कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे व पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर आणि सर्व ग्रा.प सदस्य यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
        लोणी स्टेशन येथील लातूर अर्बन बँकेकडून एक लाख वारकरी भक्तास् अन्नसेवेचे आयोजन करण्यात आले होते .बँकचे अध्यक्ष प्रदीप राठी यांच्या प्रेरणेने लोणी काळभोर येथे सेवा चालू आहे यावेळी माजी सरपंच नंदु काळभोर उपस्थित होते .विशेष करुण बचत गटाच्या व सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना पगड़ी बांधून पालखी सोहळ्यामध्ये सहभागी करण्यात आले तसेच एम आय टी विश्वराज हाॅस्पिटलच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
         सायंकाळी सात वाजन्याच्या सुमारास पालखी सोहळा लोणी काळभोर मध्ये प्रवेश केला येथे  लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर उपसरपंच संगीता काळभोर ग्रामविकास अधिकारी जे एच बोरावणे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या वतीने स्वागत केले .त्यावेळी सर्व वारकरी टाळ-मृदगाच्या तालावर नाचत होते.काहीजण फुगड्या खेळत होते.त्याच उत्साहात ग्रामस्थांनी त्याचे फुलांच्या वर्षावात स्वागत केले.दतमंदिराजवळ हवेलीचे जेष्ठ नेते माधव काळभोर, मा.जि.प.सदस्य विलास काळभोर ,काॅॅॅग्रेसचे शिवदास काळभोर, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार , सुभाष काळभोर , पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर , माजी उपसरपंच आण्णासाहेब काळभोर,  भरत काळभोर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. शिवसेनेच्या वतीने महीला जिल्हा संघटक श्रद्धा कदम पृथ्वीराजकपूर मेमोरियल हायस्कुलचे ढोल-लेझीम पथक होते,तर कन्याप्रशाळेच्या विद्यार्थिनीची वृक्षदिडी होती
          पालखी गावातील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोहोचल्यानतर आरती झाली.सर्व वारकऱ्यांना अबंरनाथ लोकसेवा प्रतिष्ठान,सत निरकारी मंडळ,शितला शक्ती मंडळ,शिवशक्ती मंडळ,जय बजरग मंडळ,संत रोहिदास चँरिटेबल ट्रस्ट,जय महारष्ट्र तरुण मंडळ,ओमसाई ग्रुप,गोसावी समाज सघटना,राजा शिव छत्रपती तरुण मंडळ,महात्मा फुले मित्रमंडळ,श्रीकृष्ण मित्र मंडळ,त्रिमूर्ति मित्र मंडळ,समता समाज सेवा तरुण मंडळ,क्रांतिवीर मित्र मंडळ,श्रीमंत अंबरनाथ मंडळ,महात्मा गांधी मंडळ,व इतर सेवाभावी संस्थांनी भोजन प्रसादाची व्यवस्था केली होती.दरवर्षी हा सोहळा एकादशीच्या दिवशी मुक्कामी येतो व दुसर्या दिवशी द्वादशीचा उपवास सोडुन यवतकडे मार्गस्थ होतो त्यामुळे ग्रामस्थांकडून उपवास सोडण्यासाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
         महसूल विभागाकडून हवेलीचे प्रांत अधिकारी संजय आसवले,तहसीलदार तृप्ती कोलते, नायब तहसीलदार अनिल भोसले तसेच गणगे यांनी दिंड्यांच्या सहकार्यासाठी विशेष लक्ष ठेवून होते.
         लोणी-काळभोर ग्रामपंचायत तसेच आदर पुनावाला फाऊंडेशन यांच्यावतीने ओला व सुका कचरा वेगळा करुन गावात कचरा होणार नाही याचे नियोजन करण्यात आले होते.पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पाखळी सोहळ्याच्या सुरक्षेचे चोख नियोजन केले.
          भजन,किर्तन,प्रवचन व हरिनामाच्या जागरामुळे लोणी काळभोर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.यावेळी एकुण 329 दिंड्या सोहळ्यात सहभागी झाल्या असल्याची माहिती सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे व अजीत महाराज मोरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *