पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या अध्यक्षपदी थेऊरचे माजी सरपंच तात्यासाहेब काळे यांनी फेरनिवड झाली आहे नुकताच त्यांचा सत्कार राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला.
तात्यासाहेब काळे यांनी मागच्या कालखंडात राज्यातील साखर कामगारांच्या वेगवेगळ्या अडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला संपूर्ण राज्यभर दौरे केले संघटना मजबूत करून कारखान्यावर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या माध्यमातून कामकाज करून कारखाना व्यवस्थापन यांच्याशी वारंवार बैठका घेतल्या.
त्यांची फेरनिवड झाल्याने पुढील कार्यकाळात आणखी कामगारांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

